सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
निरा उजव्या कालव्याला माळशिरस (पिलीव) येथे भगदाड पडले.
नीरा उजवा कालव्याला ऐन उन्हाळ्यामध्ये बघदाड पडल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव या गावच्या हद्दीमध्ये घडलेली आहे.
तीव्रतेच्या उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासते त्यामुळे फलटण ,माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील लोकांची पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते, अशातच पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवरून बसलेला असतो.
नीरा उजव्या कालव्याला शंभरहून अधिक वर्ष होऊन गेली आहेत आणि नियम बाह्य सायपण द्वारे पाणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे वारंवार नीरा उजवा कालव्याला भगदाड पडण्याचे प्रमाण वाढले असून जलसंपदा विभागाने याच्याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अन्यथा अस्तरीकरणाचे काम चालू करण्यात यावे, असा जर वेळोवेळी निरा उजवा कालव्याला भगदाड पडण्याचे प्रमाण वाढले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेती वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता घेता निरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरण होणे गरजेचे आहे.
Post a Comment
0 Comments