सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ दादा जाधव
बिबट्याच्या वावरामुळे खामगाव मधील पठाण वस्ती व नलवडे वस्तीवरील वरील नागरिक भयभीत-वनविभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
आज सहा सात दिवस झाले, पठाण वस्ती, नलवडे वस्ती बिबट्याच्या दहशती खाली वावरत आहे वनविभाग अधिकारी लक्ष देत नाही दिवसा सुद्धा शेतात काम करत असताना कुत्रे जरी ऊसात पळाले तरी अंगावर काटा उभा राहतोय शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत
वनाधिकारी आवारे टोलवाटोलवीची उत्तरे देताना दिसत आहेत नागरिकांच्या समाधानासाठी भेट देऊन गेले आहेत काय?अशी नागरिकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत तर बिबट्या ला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम बोलवून त्याला जेरबंद करावे अशी पठाण वस्ती व नलवडे वस्तीवरील नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत
मात्र वनाधिकारी आवारे व त्यांचे अधिकारी माणसांवर हल्ला करण्याची वाट बघत आहेत काय?असा प्रश्नचिन्ह उत्पन्न होत आहे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments